ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. तत्पूर्वी, नायडू यांनी सर्व उच्च सभागृह नेते, तसेच राजकीय पक्षांव्यतिरिक्त अन्य गटांनाही या बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. नायडू यांच्या निवासस्थानी संध्याकाळी ही बैठक होणार आहे. Advertisements Delhi | Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu to hold a meeting with floor leaders of the House today, ahead of the commencement of the Monsoon session of Parliament from July 19 संसदेचे आगामी पावसाळी अधिवेशन वादळी ठरेल, अशी भीती आहे. कारण विरोधी पक्ष देशातील कोरोना, भाववाढ, बेरोजगारी यांसह अनेक मुद्द्यांवर सरकारला वेठीस ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्य विरोधी पक्ष कॉंग्रेस कोरोना आणि इतर मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर सतत हल्ला चढवत आहे. Share previous post next post Related Stories