Stay updated with breaking news from பால் பாட்டீல். Get real-time updates on events, politics, business, and more. Visit us for reliable news and exclusive interviews.
‘मला भरपूर कामे आहेत. कोणी काहीही बोलत बसेल. मला त्यावर बोलायला वेळ नाही, माझे काम भले आणि मी भला,’ असे सांगत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या आराेपांवर बोलणे टाळले. | Ajit Pawar avoided speaking on Somaiya's allegations
अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेची सरसकट थकीत शेती कर्जे माफ करण्याचा तसेच कामगारांची देणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांना आणि ३ हजार २९६ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. | 348 crore loan forgiven by Bhuvikas Bank; Deputy Chief Minister Ajit Pawar order
पुरबाधित जिल्ह्यातील व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना ठाकरे सरकारचा दिलासा tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
भु-विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी- कार्याध्यक्ष एम.पी.पाटील tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
पूरबाधित व्यावसायिकांना होणार अल्प व्याजदराने कर्जपुरवठा tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
Will Announce Aid After Inspection Of Western Maharashtra CM Uddhav Thackeray; News And Live Updates राज्यात 149 बळी:आश्वासनांचा पूर, मदतीचा दुष्काळ; मुख्यमंत्री चिपळूणमध्ये, केंद्रीय मंत्री राणे तळियेत; पश्चिम महाराष्ट्राच्या पाहणीनंतर मदत जाहीर करणार - मुख्यमंत्री मुंबईएका दिवसापूर्वी कॉपी लिंक वादळे, महापूर हा मुख्यमंत्र्यांचा ‘पायगुण’ : राणे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी दौरे काढले. या दाैऱ्यात सर्वच नेत्यांनी मदतीच्या आश्वासनांचा ‘पूर’ आणला. मात्र प्रत्यक्षात आपत्तीग्रस्तांसाठी मदत किती व केव्हा मिळणार याबाबत मात्र कुणीही स्पष्टपणे सांगितले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना खासदार विनायक राऊत होते. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रायगड जिल्ह्यातील तळिये या दरडग्रस्त गावाला सकाळी भेट दिली. त्यांच्यासोबत विधिमंडळातील दाेन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर होते. दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील देवरूख (ता. वाई) या दरडग्रस्त भागास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी गुरुदत्त कारखान्यावर तात्पुरत्या निवासाची साेय केली आहे, तिथे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली. वादळे, महापूर हा मुख्यमंत्र्यांचा ‘पायगुण’ : राणे चिपळूणमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीवरून भाजप नेते तथा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘राज्यात पूरस्थिती आली आहे. त्यानंतर चार दिवसांनी मुख्यमंत्री चिपळूणमध्ये आले. हे कसले मुख्यमंत्री आहेत? मी तर म्हणतो राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही. राज्य चालवता येत नसेल तर केंद्राला देऊन टाका. आम्ही वेटिंगवरच आहोत,’ असा हल्ला राणेंनी चढवला. वादळं काय, पाऊस काय, सगळंच चालू आहे. हा मुख्यमंत्र्यांचा ‘पायगुण’ आहे. ते पदावर आले तेच कोरोना घेऊन. त्यांचे पाय बघायला पाहिजेत पांढरे आहेत का ते? आता कुठे त्यांना घरातून ‘डिस्चार्ज’ मिळालाय म्हणून ते फिरत आहेत’, अशी टोलेबाजीही नारायण राणेंनी केली. आतापर्यंत दोन लाख लोकांचे स्थलांतर राज्यात पूरग्रस्त भागातून सुमारे २ लाख ३० हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. आतापर्यंत एकूण १४९ मृत्यू झाले आहेत. तर ५० लोक जखमी असून १०० जण बेपत्ता आहेत. ८७५ गावे बाधित झाली आहेत. ३२४८ जनावरे दगावली आहेत. राज्यात एनडीआरएफची २५, एसडीआरएफ ४, कोस्ट गार्ड २, नाैदल ५, लष्कर ३ पथके मदतीसाठी कार्यरत आहेत. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड- रत्नागिरीस प्रत्येकी २ कोटी, तर इतर जिल्ह्यांना प्रत्येकी ५० लाख मदत. चिपळूणला ५ तात्पुरत्या निवारा केंद्रांची स्थापना केली. मुख्यमंत्री म्हणाले : पश्चिम महाराष्ट्राच्या पाहणीनंतर मदत जाहीर करणार १. नारायण राणे पंतप्रधान आवास योजनेतून तळिये दरडग्रस्तांना पक्की घरे बांधून दिली जातील. २. देवेंद्र फडणवीस एनडीआरएफच्या निधीतून दरडग्रस्तांना योग्य ती मदत केली जाईल. ३. उद्धव ठाकरे स्थानिक स्तरावर मदतीसाठी यंत्रणा उभी करणार. ४. बाळासाहेब पाटील : शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ५. सतेज पाटील छावणीतील नागरिक व जनावरांच्या खाण्याचा खर्च राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून भागवला जाईल. साहेब... काहीतरी करा, नुसते पाहून जाऊ नका - चिपळूणकर आम्ही आजपर्यंत इतरांना देणारे होतो, या पुराच्या पाण्याने आम्हाला घेणारे केले आहे, असा आक्रोश करत चिपळूण येथील पुराच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्यापाऱ्यांच्या संतापाला सामाेरे जावे लागले. बघून जाऊ नका, आम्हाला पुन्हा उभे राहण्यासाठी काहीतरी मदत करा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. चिपळूण शहरात २२ जुलै रोजी पुराचे पाणी घुसले. पाण्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे रविवारी गेले होते. सकाळी ११ वाजता हे नेते अंजनवेल येथे हेलिकाॅप्टरने पोहोचले. चिपळूणच्या बाजारपेठेत पायी फिरून त्यांनी भीषणता पाहिली. पानगल्लीतील महिलेने मदत न मिळाल्याबद्दल ठाकरेंना अक्षरश: जाब विचारला. ‘आम्ही देणारे होतो हो, आज घेणारे झालो आहोत. हे अंगावरचे कपडे इतरांनी दिलेत. दोन वेळचे जेवण दुसऱ्यांकडून घ्यावे लागते, असे म्हणत ‘साहेब, काहीतरी करा, नुसते पाहून जाऊ नका,’ अशी विनवणी या महिलेने केली. बेंदरकर अाळीत व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. दुकानात दोन दिवस १२ फूट पाणी होते. सामानाचा चिखल झाला. तसेच ठेवले तर रोगराई, काढले तर भरपाई नाही, अशी कोंडी झाल्याचे सांगत ‘पंचनाम्याचे तेवढे लवकर बघा’ अशी मागणी व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. वडनाका भागातील व्यापाऱ्यांनी पिण्याचे पाणी अन् वीज चालू करा, इतकीच मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. भोंगाळे गल्लीतील व्यापारी ‘कर्ज मिळवून द्या साहेब’ असे म्हणाले. ‘सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफी देते. कोकणाने आजपर्यंत काहीच मागितले नाही, एकदा मदत करा, असे काही व्यापारी मुख्यमंत्र्यांना म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री गाडीत आले अन् गाडीत बसून निघून गेले. त्यांनी काय पाहिले हा प्रश्नच आहे, असे म्हणत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कर्जाचे बघा, कोकणाला पुन्हा उभे करा, असे लांबून ओरडून सांगण्याचा व्यापाऱ्यांनी प्रयत्न केला. अनेक व्यापाऱ्यांनी वशिष्ठ व शिव नदीतला गाळ काढण्याची सूचना केली. काही व्यापाऱ्यांनी ‘सूचना न देता धरणातून पाणी सोडू नका’ अशी विनवणी केली. मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना आमदार भास्कर जाधव, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे होते. भास्कर जाधव यांच्याकडून अडथळे मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडताना स्थानिक शिवसेना आमदार भास्कर जाधव व्यापाऱ्यांना मोकळेपणाने बोलू देत नव्हते. बास करा, थांबा.. आपले सीएम आहेत, असे म्हणत आमदार जाधव अडथळे आणत होते. बातम्या आणखी आहेत...
PIL in Kerala High Court alleges Muslims, Christians pampered in Kerala, minority status should be reassessed barandbench.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from barandbench.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
due to heavy rain and landslide 129 killed in various incidents in the maharashtra india.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from india.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
वार्ताहर/ कराड ऐतिहासिक सदाशिवगडावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून रस्ता करण्यात येत आहे. यामुळे गडाच्या विकासासह सदाशिवाच्या दर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे गड विकासास कोणी खोडा घालू नये. विरोध करणाऱयांच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल. मात्र केवळ स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी विरोध केलाच तर विरोध मोडून रस्ता करण्यासाठी पाच गावातील ग्रामस्थ सक्षम आहेत, असा इशारा पाच गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला. Advertisements हजारमाचीच्या सरपंच विद्या घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव, बाबरमाचीच्या सरपंच सुनीता कदम, उपसरपंच राहुल जांभळे, राजमाचीचे सरपंच शिवाजीराव डुबल, वनवासमाचीचे सरपंच महादेव माने, विरवडेचे सहय़ाद्रि करखान्याचे संचालक रामदास पवार, अधिक सुर्वे, ऍड. चंद्रकांत कदम, प्रल्हादराव डुबल, ऍड. दादासाहेब जाधव, पोलीस पाटील मुकुंदराव कदम, दीपक लिमकर, प्रकाश पवार, एस. के. डुबल, सतीश पवार, जनार्दन डुबल आदींची प्रमुख उपस्थिती होती. ऍड. चंद्रकांत कदम व प्रल्हादराव डुबल म्हणाले की, गडावर सदाशिवाचे प्राचीन शिवमंदिर आहे. गडाच्या पायथ्याला असलेल्या हजारो ग्रामस्थांचे सदाशिव श्रद्धास्थान आहे. मात्र वयोवृद्ध, आजारी, अपंग, अनेक महिला व ज्यांना वेळेअभावी गडावर चालत जाणे शक्य नाही, असे लोक दर्शनापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे गडावर रस्ता करावा, असे पाच गावांच्या ग्रामसभांत ठराव करण्यात आले आहेत. पाच गावे, सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्या वतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गडावर रस्ता व शिवसृष्टी प्रकल्प साकारण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. त्यांनी रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. सदाशिवगडाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या चार माच्यांनी गडाच्या विकासाठी आजवर मोठय़ा प्रमाणात योगदान दिले आहे. चार माच्यांनी गडाच्या विकासाठी नवनवीन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास कुणी खोडा घालू नये. सदाशिवगड ही चार माच्यांसह परिसरातील गावांची अस्मिता आहे. गडाच्या संरक्षण व संवर्धनासाठी चार माच्या सक्षम आहेत. गडाच्या विकासकामांत आजवर ग्रामस्थांनी कधी विरोध केला नाही. त्यामुळे चार गावचे ग्रामस्थ करीत असलेल्या विकासकामांना कोणी विरोध करून विध्वंसक स्वरूप देण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा विरोध करणाऱयांचा विरोध मोडण्यासाठी ग्रामस्थ सक्षम आहेत, असा इशारा प्रकाश पवार यांनी दिला. सदाशिवगडावर रस्ता व्हावा म्हणून पाच गावच्या ग्रामसभांसह विभागातील राजकीय, सामाजिक, पर्यावरण, नाभिक, व्यापारी, रिक्षा युनियन, अपंग, गुरव समाज आदी संस्था व संघटनांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे लेखी स्वरूपात मागणी केलेली आहे. सदाशिवगड विभागातील एकाही संस्थेचा रस्त्याला विरोध नाही. मात्र काही लोकांच्या स्वार्थात बाधा येत असल्याने हे लोक बाहेरील संस्थांना चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन विरोध दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदाशिवगड व विभागातील लोकांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. पिढय़ानपिढय़ा सदाशिवगडाच्या पायथ्याला रहाणाऱया लोकांनी आतापर्यंत गडाचे संवर्धन व संरक्षणाचे कार्य केले आहे. यापुढे सदाशिवगड व लोकांची बदनामी केल्यास खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा दीपक लिमकर, प्रशांत यादव, शिवाजीराव डुबल, महादेव माने, विद्या घबाडे, सतीश पवार यांनी दिला आहे. यावेळी, कल्याणराव डुबल, शंकरराव कदम, पितांबर गुरव, अवधुत डुबल, विनोद डुबल, उमेश माने, कृष्णत काळे, कुमार इंगळे, राजू काटवटे, शंकर खोचरे, बाबासाहेब पवार, सर्जेराव पानवळ, दिपक पाटील, गणेश घबाडे, प्रशांत थोरात, विक्रम मोकाशी व ग्रामस्थ उपस्थित होते. रस्ता होणारच-प्रशांत यादव सदाशिवगड विभागातील सर्व गावातील, सर्वपक्षियांच्या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. रस्त्याचा सर्व्हे करण्यात आला आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून सदाशिवगडावरील रस्ता व शिवसृष्टीसारखे इतिहासाला उजाळा देणारे काम उभा रहात आहे. त्यास कोणीही खोडा घालू नये, गडाच्या विकासासाठी विरोध करणाऱयांनी सोबत यावे. त्यांच्या सूचनांचे स्वागतच करू अन्यथा विरोध मोडून रस्ता होणारच, असा इशारा प्रशांत यादव यांनी दिला आहे. Share
थकीत वीज बीलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पुर्ववत करा tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.